LokSabha 2019 : शेट्टी म्हणतात; विशाल पाटीलच जयंतरावांच्या मनातील उमेदवार 

Raju Shetty
Raju Shetty

सांगली : सांगली लोकसभेचे स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील आहेत आणि तेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या मनातील तगडे उमेदवारही आहेत असा दावा खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. विशाल यांची उमेदवारी जाहीर करण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेत शेट्टी यांनी आज विशाल यांची बाजू ताकदीने लावून धरली. 

गेल्या पंधरा दिवस सांगलीच्या आघाडीच्या जागेबाबत सुरु असलेला घोळ अखेर आज संपला. काँग्रेस की स्वाभिमानी असा खेळ सुरु होता. काँग्रेसच्या चिन्हावर अन्यथा अपक्ष अशी आग्रही भूमिका ठेवणाऱ्या विशाल यांना कालच शेट्टी यांनी स्वाभीमानीकडून लढा अन्यथा पर्याय शोधू असा इशारा दिला होता.

रात्रभराच्या खलबतानंतर आज सकाळी विशाल यांनी स्वाभीमानीकडून लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज दुपारीच शेट्टी यांनी विशाल यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम आणि कोल्हापूरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे उपस्थित होते. शेट्टी म्हणाले, "आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यातील 13 जागा लढवायची तयारी ठेवली होती. मात्र जातीयवादी भाजपला दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी, शेकापसह 56 पक्ष संघटनांनी एकत्र लढवायचे ठरवले. त्यात आमच्या वाट्याला दोन जागा आल्या. आम्ही हातकणंगलेसह बुलढाणा, वर्धा आदी जागांसाठी आग्रह धरला होता. अखेर महाआघाडीच्या बैठकीत सांगली दिली. तरीही काँग्रेसमध्ये वाद निर्माण करुन जागा नको, अशीही भूमिका घेतली. त्यानंतरही जागा आम्हालाच दिल्याने मी विशाल पाटील यांना स्वाभिमानीकडून उमेदवारी घेण्याचा आग्रह धरला. तो त्यांनी अखेर मान्यही केला. त्यांना स्वाभिमानी संघटनेचा एबी फॉर्म दिला जाईल. 

खासदार शेट्टी म्हणाले, "विशालयांच्या उमेदवारीबाबत मी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसह प्रमुख पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही. सांगली-कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष येथे उपस्थित आहेत. दिल्लीतील काँग्रेसचे प्रभारी, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर पुढे वाटचाल सुरु आहे. सांगली लोकसभा मतदार संघावर 1980 पासून दादा घराण्याचा सबंध आहे. तोच यावेळी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. माझे व वसंतदादा पाटील कुटुंबाचे राजकारणापलीकडचे स्नेहसंबंध होते. आता ते उघड झाले आहेत.'' 

शेतकरी चळवळ या प्रश्‍नांवर शेट्टी म्हणाले, "चळवळ व राजकारण ही गोष्ट वेगळी असेल. भविष्यात पुन्हा कारखानदाराविरोधात आम्ही लढायची तयारी आहे. त्यावेळी विशालही आमच्याबरोबर असतील. त्यांनी आता त्यांचा कारखाना चालवायला दिल्याने त्यांना अडचण नाही.'' 

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कदम म्हणाले, "काँग्रेसच्या दिल्लीतील बैठकीत विशाल पाटील यांनी स्वाभिमानीकडून लढण्यास संमत्ती दिली आहे. त्यासाठी त्यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याची आवश्‍यकता नाही.'' कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष आवाडे म्हणाले,"" भाजपच्या पराभवासाठी सर्व काही सुरु आहे.'' 

"स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मी पाईक आहे. जागा वाटपात बदल होत नसल्याने भाजप विरोधात म्हणून स्वाभिमानीबरोबर आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला आहे. वसंतदादा पाटील यांना राजकीय संन्यास घेतल्यानंतर शेतकरी संघटना काढणार होते. आता आम्ही संघटनेकडून लढतोय. आम्ही दादांच्या विचारानेच वाटचाल करीत आहोत.'' 
- विशाल पाटील, स्वाभीमानीचे उमेदवार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com