कारणराजकारण: भाजपला वानवडी ठरेल हक्काची (व्हिडिओ)

कारणराजकारण: भाजपला वानवडी ठरेल हक्काची (व्हिडिओ)

वानवडी: सरकार कोणतेही येऊ दे, फरक काही फारसा जाणवत नसल्याचे मत वानवडी येथील नागरिकांनी कारणराजकारणच्या फेसबुक लाईव्ह मध्ये व्यक्त केले. 'रोजगाराचा मुद्दा गंभीर असला तरी तो 5 वर्षात सुटेल एवढा लहान नाही. त्यासाठी भाजपला आणखी संधी द्यावी,' असे या भागातील नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या. 

वाहतुकीचा प्रश्न बऱ्याच लोकांनी बोलून दाखवला. 'आपल्याकडे व्यवस्था आहे पण अंमलबजावणी नाही, स्पीड ब्रेकर नाहीत,' असेही येथील नागरिक सांगतात. सामान्य लोकांना परवडेल अशा सुविधा जसं महागाई कमी करणे हे सरकारपुढे आव्हान असल्यचे नागरिकांनी मत व्यक्त केले.

पाच वर्षपुर्वीपर्यंत गॅसचा भाव परवडेल असा होता. पण गेल्या 5 वर्षात 900 ते 930 रुपये मोजवे लागत आहेत. अशा महागाईमुळे घरात कमावणारे दोघेही नसले महिन्याचं बजेट बिघडतं. महिला सुरक्षा नाहीच, पण या गोष्टीला केवळ सरकारची जबाबदारी नाही, तर नागरिकांनी ही सजगता दाखवावी, असे मत वानवडीतील महिलांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com