Election Results : 'विरोधकांवर टीका केली नाही म्हणूनच एवढे मताधिक्य' - गिरीश बापट 

MP Girish Bapats first Press Conference after victory in lok sabha 2019 election
MP Girish Bapats first Press Conference after victory in lok sabha 2019 election

पुणे : 'या निवडणूकीत अंदाजापेक्षा थोडी कमी मते मिळाली. विरोधी उमेदवाराने आरोप केले पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. पुणेकरांनी योग्य निर्णय घेतला,' अशा भावना  पुण्याचे पुन्हा एकदा विजयी खासदार गिरीश बापट यांनी निकालाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज (ता. 24) व्यक्त केल्या. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

'पुणेकरांच्या जाहीरनाम्याला मी बांधील आहे. पुण्याचा पाणी प्रश्न सोडविण्याला मी प्राधान्य देणार आहे. आतापर्यंत पीएमआरडीए, रेल्वे, चांदणी चौक अशी अनेक कामे मार्गी लावली आहे. यानंतरही पुढील पाच वर्षात शहराचा चेहरामोहरा बदलू,' असा विश्वास बापट यांनी यावेळी पुणेकरांना दिला आहे. 

विकासाच्या मुद्द्यावरही त्यांनी आपण विकासासाठी बांधील असल्याचे सांगत 'पुणेकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही,' अशी आश्वासक भूमिका मांडली. विकासाचा कार्यक्रम लवकरच जाहीर करणार असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.  

या लढतीतील विजयात विरोधकांचाही सहभाग असल्याचे मत व्यक्त करत बापट म्हणाले, 'मी विरोधकांवर टीका केली नाही त्यामुळेच एवढे मताधिक्य मिळवू शकलो.'

बारामतीत प्रयत्न कमी पडले असल्याचा खेदही बापट यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले, 'आमची ताकद तेथे कमी पडली. तरीही बारामतीची लढाई चालूच ठेवू. मावळमध्ये जनतेने घराणेशाही अमान्य केली.'   

तसेच 'पालकमंत्री कोण यावर चर्चा नाही. मी जुन्या पदाचा राजीनामा देईल. 
माझ्यापेक्षा अनेक चांगले लोक आमच्याकडे आहेत. याबाबत योग्य निर्णय होईल.' अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com