Loksabha 2019 : शरद पवारांनी माघार घेणे म्हणजे सरकारचे दडपण : प्रकाश आंबेडकर

prakash ambedkar
prakash ambedkar

अकोला : 'देशाच्या राजकारणात सध्या दबाबतंत्राचा नवीन फंडा सुरू झाला आहे. अगदी कुटुंबातही हे राजकीय दबावतंत्र वापरले जात आहे. नात्या गोत्यातील माणसांना सत्तेत नेऊन बसविण्याचा हा राजकीय उद्देश त्यामागे आहे. देशभर काँग्रेसशी कोणत्याही पक्षाची आघाडी होऊ नये म्हणून दबावतंत्राचा वापर होत आहे. भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे सुतोवाच त्या उद्देशानेच आहे,' असे वक्तव्य करून भाजपतर्फे दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचा आरोप ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजप व आरएसएसवर गुरुवारी (ता. 14) अकोला येथे पत्रकार परिषदेत केला. 

पत्रकार परिषदेतील अॅड. आंबेडकर यांनी सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे :

  • समझोत्याचे राजकारण केले तर जेलची हवा नक्की असेल. असे घृणास्पद राजकारण सध्या देशात सुरु आहे. 
  • 1990 च्या लोकसभेमध्ये मी गेलो तेव्हा असेच आरोप बेच्छुटपणे केले जात होते. त्यात अनेक मंत्री, नेते संपले. आता सुद्धा ब्लॅकमेलिंगचेच राजकारण सुरू आहे. त्यात काही बळी पडले तर काही खंबीरपणे उभे आहेत. 
  • काँग्रेससोबत देशभर कुठेही आघाडी होऊ नये, अशीच स्थिती भाजप व संघ परिवाराकडून निर्माण केली जात आहे. भाजपच्या या नितीचा निषेध करतो. 
  • देशात फॅसिस्ट सरकार येऊ पाहत आहे. नोटबंदीपूर्वी आरबीआयने सांगितलेल्या संभाव्य धोक्यानंतरही नोटबंदी जाहीर करण्यात आली. 
  • सर्वोच्च न्यायालयामध्ये दस्तऐवज सादर करणाऱ्यांवर गुन्हेगारी स्वरुपाचा खटला दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. यानिमित्ताने मी न्यायालयाला सांगू इच्छितो की, देशात राजेशाही संपली आहे. एखादा व्यक्ती नोकदार असेल, त्याला त्याचे नियम पाळावे लागतात; मात्र तो या देशाचा नागरिकही आहे, हे विसरून चालणार नाही. 
  • सर्वोच्च न्यायालयात त्याने दाखल केलेले दस्तऐवज हा त्याचा अधिकार आहे. त्यात गोपनियतेचा भाग नाही. भाजप त्याचे राजकारण करीत आहे, त्याचा मी निषेध करतो.
  • जमीन घोटाळ्यात एकट्या रॉबर्ट वाद्राचा सहभाग नसून संपूर्ण कुटुंबाचीच चौकशी झाली पाहिजे. 
  • जमीन घोटाळ्यात संपूर्ण कुटुंब सहभागी असल्याचे पुरावे होते, ते आधी का दिले नाही. स्वतःला वाचविण्यासाठी कुणाला तरी ईडीसमोर पाठविले जात आहे. आता कारवाई करू, असे वक्तव्य करून ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न होत आहे.
  • या दबावतंत्राचा वापर माझ्यावरही झाला होता. पीएमच्या कटात मला मुख्य आरोपी करण्याचा प्रयत्न झाला होता. 
  • शरद पवारांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर माघार घेणे, विखे पाटलांचा मुलगा भाजपमध्ये जाणे, रणजितसिंह मोहिते पाटलांचा मुलगा मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असणे, हे सर्व दबावाचे बळी आहेत.

नाना पटोले डमी उमेदवार -
काँग्रेसने नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या विरोधात नाना पटोले यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र पटोले हे काँग्रेसचे डमी उमेदवार आहे. आरएसएसच्या दबावतंत्राचा तो एक भाग आहे. 

उमेदवार यादी आज होणार जाहीर - 
वंचित बहुजन आघाडीच्या सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी शुक्रवारी जाहीर करण्यात येणार असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

भारिप-बमसं लोकसभेनंतर वंचित आघाडीत विलिन -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या रिपब्लिकन चळवळीचे पुनरुर्जीवन करून भारिप-बमसंची स्थापना चार दशकांपूर्वी करण्यात आली होती. भारिप म्हणून राजकारणात पक्ष विस्ताराला येणाऱ्या मर्यादा लक्षात घेता भारिप-बमसंच लोकसभेनंतर वंचित बहुजन आघाडीत विलिन करण्यात येणार असल्याची माहिती ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com