Loksabha 2019 : गांधी कुटुंबाला हवी देशाची मालकी - उमा भारती

नागपूर - भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उभा भारती यांचे स्वागत करताना लोधी क्षत्रिय संस्थेचे पदाधिकारी आणि समाजबांधव.
नागपूर - भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उभा भारती यांचे स्वागत करताना लोधी क्षत्रिय संस्थेचे पदाधिकारी आणि समाजबांधव.

नागपूर - गांधी कुटुंबाला कोणतीही जबाबदारी न स्वीकारताच देशावर मालकी हक्क मिळवून केवळ ‘रेव्हेन्यू कलेक्‍शन’ करायचे असल्याची घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी आज येथे केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर लोधी क्षत्रिय संस्थेतर्फे मंगळवारी शुक्रवारी तलावाजवळील रजवाडा पॅलेस येथे आयोजित स्नेहसंमेलनात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, काँग्रेस नेतृत्व गैरजबाबदार आहे. त्यांना स्वत:कडे कोणतीही जबाबदारी नको आहे. 

सत्ता आल्यास मनमोहन सिंग यांना पंतप्रधान करून रिमोट कंट्रोल आपल्याकडे ठेवायचा आहे. यापूर्वीही त्यांनी हेच केले. दुसरीकडे ‘न खाऊंगा न खाने दुंगा’ म्हणणाऱ्या नरेंद्र मोदी आणि भाजपला प्रत्येक शहर आणि गावात चौकीदार ठेवायचा आहे. यामुळेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना गतवेळपेक्षा अधिक मताधिक्‍याने निवडून द्या, त्यात लोधी समाजाचे प्रयत्न लक्षणीय असावेत, असे आवाहन त्यांनी केले. केंद्राच्या ओबीसी आरक्षण यादीत लोधी समाजाचा समावेश निश्‍चितच करून देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. यावेळी आमदार विकास कुंभारे, नगरसेवक किशोर कुमेरिया, दयाशंकर तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते. 

राम राजकारणाचा नाही तर आस्थेचा विषय असून भाजपच्या जाहीरनाम्यात राममंदिरासह कलम ३७० चा समावेश राहणार असल्याचे भारती यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com