Loksabha 2019 : धर्माला दहशतवादाशी जोडण्याचे काम काँग्रेसने केले : अमित शहा

Loksabha 2019 : धर्माला दहशतवादाशी जोडण्याचे काम काँग्रेसने केले : अमित शहा

बिजनौर : काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी राजकीय स्वार्थासाठी घाणेरडे राजकारण केले. हिंदूंना बदनाम केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी सर्वांची माफी मागितली पाहिजे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (रविवार) सांगितले. तसेच हिंदू धर्माला दहशतवादाशी जोडण्याचे काम काँग्रेसने केले. त्यांनी हिंदूंना बदनाम केले, असेही अमित शहा म्हणाले.

उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे आयोजित एका सभेत अमित शहा बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, देशाच्या सुरक्षेशी खेळण्याचे काम काँग्रेसने केले. काँग्रेस नेहमी मतविभाजन करण्याचे राजकारण करत असते. त्यामुळे राहुल गांधी यांना आता अमेठी लोकसभा मतदारसंघ सोडून दुसरीकडून निवडणूक लढवावी लागत आहे. अमेठीतून त्यांचा हिशेब चुकता केला जाणार आहे, असे राहुल गांधींना आता माहीत झाले आहे. याच पार्श्वभूमीवर अमेठीच्या पराभवाला घाबरुन राहुल गांधी वायनाड येथे पळाले, असेही अमित शहा म्हणाले.

दरम्यान, हिंदू कधीही दहशतवादी असू शकत नाही. राजकीय फायद्यासाठी संपूर्ण देशात काँग्रेसने हिंदू समुदायाला बदनाम केले आहे, असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com