Loksabha 2019 : औरंगाबादच्या विकासासाठी निवडून द्या : जलील

Loksabha 2019 : औरंगाबादच्या विकासासाठी निवडून द्या : जलील

टाकळी राजेराय : सध्या लोकसभेचे वातावरण तापत असून, एमआयएम व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी शनिवारी (ता.३०) खुलताबाद तालुक्यात प्रचारदौरा केला. याप्रसंगी टाकळी राजेराय सह देवळाणा, लोणी, बोडखा, सावखेडा, चिकलठाणा आदी गावांतील मतदारांशी संवाद साधत औरंगाबाद जिल्हाचा खुंटलेला विकास करण्यासाठी व वंचित बहुजनासह सर्वसामान्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी मत देऊन निवडून देण्याचे आवाहन आमदार जलील यांनी केले.

जलील यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेत चर्चा केली. त्यांच्यासोबत यासेर फारुकी, अजिम मनियार, अशपाक मौलाना, अनिस मामू, अजिज पटेल, खालेद पटेल, शकील पहेलवान, भास्कर मोठे आदिसह परिसरातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

युवकांचा मोठा उत्साह

जलील येणार असल्याची बातमी गावपातळीवर पसरताच तरुण वर्गाचा एकच उत्साह जाणवला. ते येताच तरुणांनी त्यांना गराडा घातला. यात अनेकांना त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com