ElectionTracker : आज काय म्हणाले, देशातील महत्त्वाचे नेते?

ElectionTracker : आज काय म्हणाले, देशातील महत्त्वाचे नेते?

निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! 

हा आहे 26 मार्च 2019 चा #ElectionTracker

राहुल गांधी

गंगानगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पुन्हा एकदा 'गरीबी हटाओ'ची साद घालत गरिबांना दरवर्षी 72 हजार रुपये देणाऱ्या 'न्यूनतम आय' योजना (न्याय) या किमान उत्पन्न हमी योजनेचे आश्‍वासन दिले. त्यावर आज (मंगळवार) राहुल गांधी म्हणाले, '2019 नंतर देशात गरीबी नसेल, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. काँग्रेसने गरीबीबाबत दिलेले आश्वासन एकप्रकारचा 'बॉम्ब'च आहे. गरीबीवर केला जाणारा हाच काँग्रेसचा 'सर्जिकल स्ट्राईक' आहे. त्यांच्याकडून (भाजप) गरीबी नष्ट करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, आता आम्ही गरीबी नष्ट करणार आहोत'.

शरद पवार

नगर - ‘सर्वांनी आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी एकजुटीने काम करावे. महाआघाडीचा धर्म पाळावा,’ असा कानमंत्र देत संग्राम जगताप यांना निवडून आणण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पदाधिकाऱ्यांना केले. 
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील रणनीती आखण्यासाठी पवार यांनी पदाधिकाऱ्यांची चार तास प्रदीर्घ बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी थेट तालुकापातळीवरील पदाधिकाऱ्यांशी हितगुज केले.

मायावती

नोटाबंदी हा अत्यंत अपरिपक्व निर्णय होता. त्याच्यामुळे श्रीमंत लोकांना काहीही त्रास झाला नसला तरी गोर गरिबांना याचे फार वाईट परिणाम सोसावे लागले आहेत. गरिबांना काम सोडून गावी परतावे लागले तसेच मोल मजूरी करुन घर चालवावे लागत आहे. भाजप माफी मागणार का?

प्रियंका गांधी

'न्याय' (NYAY) योजनेच्या माध्यमातून वर्षाला 72 हजार रुपये देशातील 5 कोटी घरांमधील महिलांच्या खात्यावर जमा होतील. ही सर्वात अधिक आनंदाची गोष्ट आहे.

अमित शहा

यापूर्वी एकमेकांचे चेहरेही न पाहणारे नेतेमंडळी आज नरेंद्र मोदीजी यांना घाबरून पुढे येत आहेत. मात्र, मी आता सांगू इच्छितो, ज्यांना कोणाला एकत्र व्हायचं आहे, त्यांनी व्हावे. उत्तर प्रदेशातील जनतेने 80 पैकी 74 जागांवर 'कमळ' फुलविण्याचा विचार केला. 

चंद्राबाबू नायडू

पोल्लावरम हे पूर्ण झालंय. या निवडणुकीत लुटणारे, राज्याचा अपमान करणाऱ्यांविरोधातील लढाई आहे. त्यांच्यापासून राज्याचे रक्षण करायचे आहे.

अरविंद केजरीवाल

लालकृष्ण अडवानी आणि मुरली मनोहर जोशी यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारून भाजपने त्यांचा अपमान केला. त्यांना उमेदवारी नाकारणारी मंडळी हिंदू संस्कृतीच्या विरोधात आहे. 

अखिलेश यादव

भाजपचे लोकसभा निवडणूकीतील मुद्दे : 1) विरोधक 2) विरोधक
चौकीदार भाजपचे प्रचारक : 1) राज्यपाल 2) सरकारी संस्था 3) मिडीया
भाजपची निवडणूकीची व्यूहरचन : 1) सोशल मीडिया 2) द्वेष 3) पैसा
भापचची पाच वर्षातील यश : 1) झुंडशाही 2) शतकऱ्यांचा अपमान 3) बेरोजगारी. भाजपवर टिका करताना त्यांनी असे मुद्दे मांडले आहेत.

योगी अदित्यनाथ

आतंकवाद, भ्रष्टाचार आणि गरिबीची मूळ काँग्रेस पक्षापाशी आहे. आज काँग्रेस स्वतः देशासाठी आणि स्वतःसाठी एक अडचण ठरत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात प्रचार करताना...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com