Loksabha 2019 : लोकसभा निवडणुकीसाठी 26 लाख शाईच्या बाटल्यांची ऑर्डर

vote
vote

म्हैसूर - निवडणुक आयोगाने लेकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. निवडणुकीमध्ये मतदान केल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे शाई. मतदान केल्यानंतर मतदाराच्या बोटाला लावण्यासाठी लागणाऱ्या शाईच्या 26 लाख बाटल्यांची ऑर्डर निवडणुक आयोगाने दिली आहे. जवळजवळ 90 कोटी लोकांवर वापरण्यात येणाऱ्या या शाईची किंमत 33 कोटी रुपये आहे.

2009 पेक्षा तिपटीने शाईची किंमत वाढली आहे. 2009 मध्ये या शाईचा खर्च 12 कोटी एवढा आला होता. तर 2014 मध्ये शाई कमी पडल्याने 4.5 लाख जास्तिच्या शाईच्या बोटल्या मागविण्यात आल्या होत्या.

एका बाटलीमध्ये साधारण 350 मतदारांना शाई लावता येते. 2004 मध्ये मतदान केल्यानंतर मतदाराच्या बोटावर शाईचा ठिपका लावण्यात येत होता. मात्र 2006 पासून मतदान केल्यानंतर मतदाराच्या बोटावर शाईची रोघ ओढण्यात येते. यामुळे शाई जास्त लागत असल्याचे आयोगाने म्हटले आहे. 

भारतात सर्वात जास्त शाईच्या बाटल्या उत्तर प्रदेशमध्ये वापरल्या जातात. जवळपास तिन लाख वाटल्या या राज्यात लागतात. तर लक्षद्विपमध्ये सर्वात कमी म्हणजे 200 शाईच्या बाटल्यांचा वापर होतो. 

म्हैसूर पेटंट्स आणि वॉर्निश ही शाई बनवते. 1962 पासून निवडणूकांमध्ये अशाप्रकारे शाईचा वापर सुरु झाला. तेव्हा 3.74 लाख शाईच्या वाटल्या निवडणूकीत वापरण्यात आल्या होत्या ज्याची किंमत तीन लाख रुपये एवढी होती.

भारतातच नाही तर जगभरातील 30 देशांमध्ये निवडणूकीसाठी या शाईचा वापर होतो. भारतातून त्यावेळी शाईची निर्यात होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com