Loksabha 2019 :...म्हणून रणजितसिंहांनी दिला राजीनामा

Loksabha 2019 :...म्हणून रणजितसिंहांनी दिला राजीनामा

फलटण : राष्ट्रवादी काँग्रेसकडून सापत्नभावाची वागणूक सतत मिळत होती. तसेच आघाडी धर्म न पाळता विकासकामात माझ्यासह कार्यकर्त्यांना अडचणी निर्माण होत राहिल्याने त्यांचा होणारा संताप अशा प्रमुख बाबी अधोरेखित करुन काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज काँग्रेसचा राजीनामा दिला.

सातारा जिल्हा हा अपवाद वगळता राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. 2009 पासून राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय कॉंग्रेसची आघाडी आहे. त्यातून एकत्रितपणे विकास कामांना प्राधान्य देण्याबरोबरच कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देणे अपेक्षित होते. पण आतापर्यंत जिल्ह्यात तसे घडले नाही. त्यातून होणारा कार्यकर्त्यांचा संताप रणजितसिंह यांना सहन होत नव्हता. तरी त्यांनी कार्यकर्ते एकत्रित ठेऊन त्यांच्या परिने तालुक्यासह जिल्ह्यात पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कामे केली. किंबहुना त्यांच्या दोन पिढ्यांनी शेती पाणी विकासासाठी प्रयत्न केल्याचे राजीनाम्यात म्हटले आहे.

गेली 10 वर्षे रखडलेली लोणंद - फलटण - बारामती रेल्वे जोडीला निरा देवघर पाटबंधारे प्रकल्पाचे अडलेले घोडे या प्रकल्पामुळे दुष्काळी भागात शेती अधिक सुपीक झाली असती. या प्रमुख बाबीबरोबर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काम न करण्याची व्यक्त केलेली भावना या सर्व बाबींचा विचार करून आपण राष्ट्रीय काँग्रेसचा राजीनामा दिला असल्याचा उल्लेख रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राजीनामा पत्रात केला. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांचे ऋणी आहोत, असेही त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com