Loksabha 2019 : मोदी सरकारच्या राजवटीत अर्थव्यवस्था जमीनदोस्त : येचुरी 

Loksabha 2019 : मोदी सरकारच्या राजवटीत अर्थव्यवस्था जमीनदोस्त : येचुरी 

नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारच्या राजवटीत अर्थव्यवस्था आणि सुरक्षाव्यवस्था जमीनदोस्त झाल्याची टीका माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केली. येचुरी यांनी मंगळवारी ट्‌विट करीत म्हटले, की सर्वच पातळीवरच्या अपयशाची जबाबदारी मोदी सरकारला झटकता येणार नाही. मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस आणली. 

जम्मू-काश्‍मीरच्या दहशतवादी हल्ल्यात 176 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. नोटाबंदीचा उद्देश हा दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडणे हा होता. मात्र, त्याचा काहीच परिणाम झाला नाही. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होण्याचे प्रमाण 2014 पासून शंभर टक्‍क्‍यांनी वाढले आहे. हे अपयश मोदी सरकार नाकारू शकत नाही आणि जबाबदारीही झटकू शकत नाही.

मोदी सरकारच्या काळात देशाने खूप गमावले आहे. नोकरीवर अस्थिरतेचे सावट वाढले असून, लोकांची क्रयशक्ती कमी झाली आहे. सरकारशी लागेबांधे असणाऱ्या उद्योगपतींचे 2014 पासून ते आतापर्यंत सुमारे 5.5 लाख कोटी रुपये कर्ज माफ केल्याचा आरोप येचुरी यांनी केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com