Loksabha 2019 : नांदेडमध्ये भाजपकडे सक्षम उमेदवार नाही : अशोक चव्हाण

Loksabha 2019 : नांदेडमध्ये भाजपकडे सक्षम उमेदवार नाही : अशोक चव्हाण

मुंबई : नांदेडमध्ये माझ्या विरोधात सक्षम उमेदवार मिळत नाही म्हणून त्यांना भाड्याने उमेदवार आणावा लागला त्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांना नांदेडकरांना उपदेश देण्याचा नैतिक अधिकार नाही. नांदेडचा विकास कोणी केला ते नांदेडच्या जनतेला माहीत आहे. नांदेडकरांनी महापालिका निवडणुकीतही या भाड्याच्या नेतृत्वाचा दारुण पराभव केला आहे. त्याचीच पुनरावृत्ती लोकसभा निवडणुकीतही होईल, असा टोला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. 

ते म्हणाले, की भाजपने या निवडणुकीत देशातील ज्वलंत प्रश्नांना बाजूला ठेवून लष्कराच्या नावावर मते मागण्याचा किळसवाणा प्रकार सुरू केला आहे. मागील पाच वर्षांत राज्यात 15 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय. सरकारने मोठा गाजावाजा केलेली जलयुक्त शिवार योजना पूर्णपणे अपयशी ठरली आहे. राज्यभरात चार हजारांहून अधिक टॅंकर सुरू आहेत, तरीही जनतेला प्यायला पाणी मिळत नाही. या भीषण दुष्काळात सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊ शकले नाही.

ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देता आला नाही. जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करू शकले नाहीत. त्यामुळे गावेच्या गावे ओस पडली असून या परिस्थितीतही आपण शेतकऱ्यांसाठी खूप काही करीत असल्याचा आव आणताना मुख्यमंत्र्यांना लाज कशी वाटत नाही, असा प्रश्‍न चव्हाण यांनी केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com