Loksabha 2019 : अमित शहा, राहुल गांधींचं भवितव्य ठरलं; देशात 63.83 टक्के मतदान!

Loksabha 2019 : अमित शहा, राहुल गांधींचं भवितव्य ठरलं; देशात 63.83 टक्के मतदान!

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज (ता.23) पार पडले. सकाळी सात वाजता या मतदानाला सुरवात झाली. त्यानंतर सायंकाळी सहाला हे मतदान पूर्ण झाले. देशात 63.83 टक्के इतके मतदान पार पडले असून, 116 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले. 

महाराष्ट्र, बिहार, गोवा, जम्मू-काश्मीर या राज्यांसह त्रिपुरा, उत्तर प्रदेश या राज्यांतही मतदान पार पडले. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 79.36 टक्के इतके मतदान झाले. तर जम्मू-काश्मीर सर्वांत कमी 12.86 टक्के मतदान पार पडले. तसेच त्रिपुरात 78. 37 तर आसाममध्ये 76.23 टक्के मतदान झाले आणि महाराष्ट्रात 56.55 टक्के इतके मतदान झाले.

याशिवाय बिहार 59.97, गोवा 71.09, गुजरात 59.98, 
कर्नाटक 64.01, केरळ 70.20, ओडिशा 58.18, उत्तर प्रदेश 57.74, छत्तीसगड 65.82 टक्के इतके मतदान झाले तर दादरा-नगर हवेली 71.43, दमण दीव 65.34 इतके मतदान पार पडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com