Loksabha 2019 : 2019 नंतर देशातील गरीबी नष्ट होईल : राहुल गांधी

Loksabha 2019 : 2019 नंतर देशातील गरीबी नष्ट होईल : राहुल गांधी

गंगानगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पुन्हा एकदा 'गरीबी हटाओ'ची साद घालत गरिबांना दरवर्षी 72 हजार रुपये देणाऱ्या 'न्यूनतम आय' योजना (न्याय) या किमान उत्पन्न हमी योजनेचे आश्‍वासन दिले. त्यावर आज (मंगळवार) राहुल गांधी म्हणाले, ''2019 नंतर देशात गरीबी नसेल, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत''.

राजस्थानातील गंगानगर येथे आयोजित एका रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी बोलत होते. ते पुढे म्हणाले, ''काँग्रेसने गरीबीबाबत दिलेले आश्वासन एकप्रकारचा 'बॉम्ब'च आहे. गरीबीवर केला जाणारा हाच काँग्रेसचा 'सर्जिकल स्ट्राईक' आहे. त्यांच्याकडून (भाजप) गरीबी नष्ट करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, आता आम्ही गरीबी नष्ट करणार आहोत.

दरम्यान, देशातील 25 कोटी जनता 21 व्या शतकात असूनही अद्याप गरीबीत आहे, ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे, असेही ते म्हणाले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com