विधानसभा होऊ शकते 28 फेब्रुवारीला भंग : अशोक चव्हाण  

औरंगाबाद ः सिडको एन-सहा येथील सभेत कार्यकर्त्यांना हात उंचावून अभिवादन करताना अशोक चव्हाण. डावीकडून भाऊसाहेब जगताप, सुभाष झांबड, नामदेव पवार, अब्दुल सत्तार, बाबा सिद्दीकी, विलास औताडे, एकनाथ गायकवाड.
औरंगाबाद ः सिडको एन-सहा येथील सभेत कार्यकर्त्यांना हात उंचावून अभिवादन करताना अशोक चव्हाण. डावीकडून भाऊसाहेब जगताप, सुभाष झांबड, नामदेव पवार, अब्दुल सत्तार, बाबा सिद्दीकी, विलास औताडे, एकनाथ गायकवाड.

औरंगाबाद -  "लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका घेण्याची भाजपने तयारी केली असून, येत्या 28 फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा भंग करू शकतात. धक्का देऊन पुन्हा सत्तेवर येण्याची भाजपची रणनीती आहे. त्यामुळे दोन्ही निवडणुका एकत्र लढण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी ठेवावी", असे आवाहन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी गुरुवारी (ता. सात) केले. 

सिडको एन- सहा येथील राजीव गांधी स्टेडियममध्ये झालेल्या जाहीर सभेत ते म्हणाले, "निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सध्या आश्‍वासनांची खैरात केली जात आहे. आणखी मोठ्या प्रमाणात घोषणा होतील; मात्र त्यांचा चुनावी जुमला आहे. लबाडाच्या जेवणावर विश्‍वास ठेवू नका. गेल्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेला केवळ 30 टक्के मते मिळाली, तरी ते सत्तेवर आहेत. त्यामुळे 70 टक्के मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी कॉंग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या घरी पाच वेळा जाऊन आलो. आंबेडकरांनी खासदार व्हावे, ही कॉंग्रेसची इच्छा आहे. मतांचे विभाजन टाळा, भाजप-शिवसेनेला पाडा." 

या वेळी माजी मंत्री बाबा सिद्धिकी, माजी खासदार एकनाथ गायकवाड, सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार, आमदार सुभाष झांबड, शहराध्यक्ष नामदेव पवार, प्रा. रवींद्र बनसोड यांच्यासह इतरांची भाषणे झाली. माजी आमदार कल्याण काळे, नितीन पाटील, केशवराव औताडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 
  
चारा छावण्यांची मागणी, दिले डान्सबार-लावणी 
राज्यात सर्वत्र भीषण दुष्काळ असल्याने जनता त्रस्त आहे. मुख्यमंत्री मात्र क्रिकेट खेळण्यात दंग आहेत. चारा छावण्यांची शेतकऱ्यांची मागणी असताना भाजप सरकारने मात्र डान्सबार व लावणी दिली, अशी टीका चव्हाण यांनी केली. विरोधकांची तुलना कुत्रे, मांजरे अशी करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे; मात्र कुत्रे-मांजरे तुमचा गळा फाडल्याशिवाय राहणार नाहीत, अशा इशारा त्यांनी दिला. 
 
"चौकीदारांना बदनाम करू नका' 
"चौकीदार चोर है' अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. त्याचा संदर्भ घेत चव्हाण म्हणाले, की चौकीदार प्रामाणिक आहेत. ते आपल्या घराचे संरक्षण करतात. त्यामुळे त्यांची बदनामी करू नका. देश का "चौकीदार चोर आहे' अशा घोषणा देण्याचे त्यांनी आवाहन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com