औरंगाबाद - "आम्ही हे केले, पुन्हा सत्ता आल्यास हे करू, असे सांगण्यासारखे सत्ताधाऱ्यांकडे काहीही नाही. त्यामुळेच तर मुख्यमंत्री माझ्या नावाचा सतत जप करीत आहेत. ते कमी पडले म्हणून की काय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही माझा जप करायला लावला. विरोधकांना धमकावत दोन वर्षांपासून नावारूपास आणलेल्या सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) गैरवापर करणे, हेच पंतप्रधानांचे नवीन योगदान असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केली. सतत आमचेच नाव घेणे, याचा अर्थ आमचं मस्त चाललंय, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली.
मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या श्री. पवारांनी शुक्रवारी (ता. 20) शहरातील सूर्या लॉन येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते म्हणाले, "विधानसभेची गत आणि आगामी निवडणूक यात जमीन-अस्मानचा फरक दिसून येत आहे. जनतेचे प्रश्न सुटू शकलेले नाहीत. त्यामुळे ठिकठिकाणी सरकारबद्दल प्रचंड चीड जाणवत आहे. आम्ही परिवर्तन करण्यासंबंधी हाती घेतलेल्या कार्यक्रमामध्ये तरुणांची कठोर परिश्रम घेण्याची तयारी आहे.'
"पाकिस्तानबद्दल माझे अमुक वक्तव्य असल्याचे पंतप्रधानांनी नुकतेच सांगितले. खोटेपणा टाळून त्यांनी आपल्या पदाला साजेसे बोलावे. निवडणूक जवळ आली की खोटे बोलण्याचा ते धडाका सुरू करतात, हे नवीन नाही,' अशी टीका श्री. पवार यांनी केली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार सतीश चव्हाण, जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, कदीर मौलाना, आमदार भाऊसाहेब चिकटगावकर आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले...
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.