वेळप्रसंगी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरू : उद्धव ठाकरे

Uddhav Thackreay Met Framers In Vineyards And Listened Their Problems
Uddhav Thackreay Met Framers In Vineyards And Listened Their Problems

कातरखटाव (जि. सातारा) : शेतकऱ्यांनो पिकांचे नुकसान झाले म्हणून हताश होऊ नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्‍वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कातरखटाव येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिले. 

आज (शुक्रवार) कातरखटाव येथील नामदेव कृष्णा बागल व दिगंबर यशवंत बागल यांच्या पीक नुकसानीच्या पाहणीप्रसंगी ठाकरे बोलत होते. या वेळी विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, तत्कालीन पालकमंत्री विजय शिवतारे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, शेखर गोरे, धैर्यशील कदम, विभागप्रमुख संतोष दुबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

श्री. ठाकरे म्हणाले, नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी पंचनामा प्रक्रियेत सामील व्हावे. तसेच गावोगावी मदत केंद्र उभारून आपल्या समस्या केंद्रावर सांगाव्यात. पीकविमा, कर्जमाफी, शेतकरी सन्मान निधी, दुष्काळी अनुदान या योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना मदत केंद्रावर बोलावून याद्या तयार करा. त्या माझ्यापर्यंत पोचवा.

ठाकरेंच्या भेटी दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू 

यानंतर प्रलंबित राहिलेल्या याद्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. आम्हावर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे काही शेतकऱ्यांनी ठाकरे यांना सांगितले. त्यावर ठाकरे यांनी आपण खचून जावू नका. वेळप्रसंगी शेतकऱ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरू, असे स्पष्ट केले.

प्रतिहेक्‍टरी पंचवीस हजार रुपये द्या ः ठाकरे

दरम्यान, प्रशासनाने पिकांच्या पाहणीनंतर त्वरित पंचनामे सादर करावेत. तसेच शेतकऱ्यांना दिलासा म्हणून प्रतिहेक्‍टरी पंचवीस हजार रुपये द्या, असे सांगत ते आम्ही करून घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरसकट भरपाई द्या शेतकऱ्यांची मागणी

चुकीचे पंचनामे केल्याने सरसकट कर्जमाफी व नुकसानभरपाई द्यावी. शासकीय यंत्रणेमार्फत पिकांचे पंचनामे झाले आहेत. मात्र, रब्बी हंगामातील मका, बाजरी, तूर, मूग आदी पिके पूर्णपणे खराब झाली आहेत. त्याचे पंचनामे होईपर्यंत ती कुजून गेली होती. शेतात पाणी असेल व पिके उभी असतील तरच पंचनामे केले आहेत.

धीर धरा आम्ही तुमच्या साेबतच : उध्दव ठाकरे

त्यामुळे त्याची फक्त दहा ते पंधरा टक्के शेतकऱ्यांना भरपाई मिळू शकते. त्यामुळे या स्थितीचा वस्तुनिष्ठ विचार करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी कणसेवाडी येथील काही शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे यांची ही घोषणा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com