ताश्‍कंदमध्ये अडकलेल्या  लोकांचे अखेर विमान ठरले 

aaa.jpg
aaa.jpg

वैद्यकीय क्षेत्रात औषध कंपन्यांचे प्रतिनिधी असलेल्या लोकांसह काही डॉक्‍टर सहलीसाठी 10 मार्च रोजी उझबेकिस्तान वला रवाना झाले होते. 17 मार्च रोजी त्यांचे परतीचे विमान निश्‍चित झाले होते, परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून बहुतांश आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण रद्द करण्यात आली. त्यात ताश्‍कंदहून भारतात येणारे विमानही रद्द झाले होते. त्यामुळे 39 मराठी लोक अडकून पडले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर या लोकांना परत भारतात आणण्यात अडचणी येत होत्या. 


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. त्यांनी परराष्ट्र मंत्र्यांना पत्र लिहून तातडीने या लोकांना परत आणण्याबाबत हालचाली कराव्यात, अशी विनंती केली. त्यानंतर भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी वेगाने हालचाली केल्या. आता शनिवारी विमानाने हे लोक भारतात परत येतील, हे निश्‍चित झाले आहे. त्यातीलच एका सांगलीकर प्रवाशाचे विमानाचे तिकीट व्हायरल झाले आहे. या 39 प्रवाशांमध्ये सांगलीचे 13, सोलापूरचे 13, कोल्हापूर आणि नाशिकचे प्रत्येकी एक तर पुणे जिल्ह्यातील अकरा लोकांचा समावेश आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com