बारावीच्या परीक्षेचं काय होणार? विद्यार्थी-पालकांचा जीव टांगणीला

STUDENTS
STUDENTSfile photo

राज्यात कोरोनाचा संसर्ग अद्यापही मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अशा परिस्थितीत मे महिन्यात बारावीच्या परीक्षा घेणे शक्य नाही. मात्र, असे असतानाही राज्य सरकार असो वा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत बारावीच्या परीक्षेबात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यातील जवळपास १४ लाख विद्यार्थी आणि त्याचे पालक यांचा जीव टांगणीला लागला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २० एप्रिल रोजी राज्य सरकारने बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय घेऊन २० दिवस उलटले तरीही ही परीक्षा कधी आणि कशा पद्धतीने होणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती व सूचना शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आलेली नाही. त्यामुळे बोर्डाची परीक्षा होणार असतील, तर नेमके विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे तयारी करावी असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. बारावीच्या परीक्षेबाबत विद्यार्थी-पालकांचा संभ्रम दिवसेंदिवस वाढत असल्याने या परीक्षेबाबत सविस्तर माहिती आणि सूचना शिक्षण विभागाने लवकरात लवकर जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

STUDENTS
बारावी परीक्षेची धाकधूक वाढली; विद्यार्थी, पालक चिंतेत

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) कोरोनाच्या संसर्गामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन जूनच्या पहिल्या आठवड्यात बारावीच्या परीक्षेबाबत निर्णय घेणार आहे. मग, राज्य शिक्षण मंडळ देखील ‘सीबीएसई’च्या निर्णयाची वाट पाहत आहे का! ‘सीबीएसई’च्या निर्णयावरून राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निर्णय घेतला जाणार आहे का!, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, बारावीच्या परीक्षेबाबत अद्याप कोणताही धोरण ठरविण्यात आले नसल्याचे शिक्षण विभागातील अधिकृत सूत्रांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचे म्हणणे :-

परीक्षा कधी होईल, हे माहित नाही. त्यामुळे अजूनही दररोज किमान तीन तास अभ्यास सुरू आहे. या काळात सराव, उजळणी करण्याला प्राधान्य देत आहे. परंतु परीक्षा कधी आणि कशा पद्धताने होणार, हे कळाले तर अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करता येईल, असं विद्यार्थी सौरभ पिसे म्हणतो.

वर्षभर ऑनलाइन शिक्षण झाले आहे, त्यामुळे परीक्षा देखील ऑनलाइन व्हावी, असे वाटते. कोरोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीत परीक्षा कधी होणार याबाबत अनिश्चितता आहे. परंतु परीक्षा होऊपर्यंत उजळणी करावी लागणार आहे. आतही दररोज उजळणी करत आहे, असं धनंजय प्रेमासागर म्हणाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com