राज्यात पीकहानी ३५ हजार कोटींवर

Agriculture-Loss
Agriculture-Loss

पुणे - अतिपावसामुळे राज्यात आतापर्यंत फळबागांसह खरीप पिकांची ३५ हजार कोटी रुपयांची हानी झाल्याचा अंदाज आहे. ‘‘राज्यात ओला दुष्काळ पडला असून, पिकांचे नुकसान वाढत आहे. त्यामुळे यंदा वाटली जाणारी पीक नुकसानभरपाई विक्रमी स्वरूपाची असेल,’’ अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

शेतकऱ्यांनी १४० लाख हेक्टरवर कष्टपूर्वक खरीप पिके घेतली आहेत. मात्र, अतिपावसामुळे प्रत्येक जिल्ह्यातून नुकसानीची माहिती शासनाकडे येत आहे. ‘‘खरिपावर आलेले संकट मोठे आणि ऐतिहासिक आहे. राज्यभर ओल्या दुष्काळाची स्थिती आहे. सरकार स्थापन झालेले नसले तरी कृषी, महसूल, अर्थ तसेच मदत-पुनर्वसन विभाग संयुक्तपणे या संकटाचा आढावा घेत आहे. यंदा शेतीमधील नुकसान ‘न भूतो न भविष्यती' असे दिसते आहे. त्यामुळे विक्रमी स्वरूपाची भरपाई वाटपाची तयारी ठेवावी लागेल, अशी पूर्वकल्पना अर्थ विभागाला देण्यात आली आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्य शासनाला कृषी व महसूल विभागाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार ४ नोव्हेंबरपर्यंत ५४ लाख ८२ हजारांवरील पिके नष्ट झाली आहेत. त्यात ५३ हजार हेक्टर वरील फळबागदेखील आहेत. ‘‘अतिपावसामुळे खरिपाचे झालेले नुकसान अंदाजाच्या पलीकडचे आहेत. आमच्या मते राज्यातील शेतकऱ्यांना त्यामुळे किमान पाच वर्षे तरी सावरता येणार नाही. कारण, आताच नुकसान ३५ हजार कोटीच्या पलीकडे गेल्याचे दिसते आहे. ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढते आहे.’’ अशी माहिती महसूल विभागाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com