राज्यातील शेतकऱ्यांचा 50 लाख टन ऊस गाळपाविना शिल्लक

राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपत आला असून काही कारखाने बंद झाले. तरीही राज्यातील शेतकऱ्यांचा 50 लाख टन ऊस गाळपाविना शिल्लक आहे.
Vasudev kale
Vasudev kaleSakal
Summary

राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपत आला असून काही कारखाने बंद झाले. तरीही राज्यातील शेतकऱ्यांचा 50 लाख टन ऊस गाळपाविना शिल्लक आहे.

कुरकुंभ - राज्यातील साखर कारखान्यांचा (Sugar Factory) गाळप हंगाम संपत आला असून काही कारखाने बंद झाले. तरीही राज्यातील शेतकऱ्यांचा (Farmer) 50 लाख टन ऊस गाळपाविना शिल्लक आहे. अतिरिक्त ऊसाच्या गाळपाची मागणी भाजप किसान मोर्चाने वारंवार करूनही नियोजन करता न येणे हे सरकारचे अपयश आहे. अतिरिक्त ऊसाचे तातडीने गाळप व्हावे इत्यादी मागण्यांसाठी किसान मोर्चाच्यावतीने 5 मे 2022 पासून पुणे येथील साखर आयुक्त कार्यालासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी दिला.

राज्यातील या गाळप हंगामातील चालू साखर कारखान्यांच्या गाळप क्षमतेपेक्षा अतिरिक्त ऊस शिल्लक असल्याने या ऊसाच्या गाळपाचे नियोजन करावे यासाठी किसान मोर्चा एक महिन्यापासून राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. तरीही अतिरिक्त ऊसाच्या गाळपाचे नियोजन व एकरकमी एफआरपीकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष राज्य सरकार व साखर सम्राट यांनी दुर्लक्ष केले. हे प्रश्न मार्गी न लावता येणे राज्य सरकारचे अपयश आहे. फेब्रुवारीत गाळप होणार ऊस मे महिना सुरू झाला तरीही शेतात उभा आहे. त्यामुळे ऊसाचे वजन मोठयाप्रमाणात घट आहे. तीव्र उष्णता, भारनियमन पाण्याची कमतरतेमुळे ऊस जगविणे अवघड झाले आहे.

स्वतः ऊस तोडून कारखान्यावर आणावा असे कारखान्यांकडून सांगणे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. सरकार व कारखान्याच्या जाचाला ऊस उत्पादक शेतकरी कंटाळले आहेत. अतिरिक्त ऊसाचे नियोजन, वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांच्या बिलातून कपात न करता तो सरकार व साखर कारखान्यांनी द्यावा.

ऊस जळीत, ऊसतोडणी उशिरा झाल्याबद्दल उसाला प्रती हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान द्यावी. शिल्लक ऊसाचे पंचनामे करून हेक्टरी 75 हजार रूपये अनुदान द्यावे. या मागण्यांसाठी भाजप किसान मोर्चाने आक्रमक भूमिका घेऊन सरकारला जाग आण्यासाठी किसान मोर्चाच्यावतीने 5 मे 2022 पासून पुणे येथील साखर आयुक्त कार्यालासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे. आंदोलना राज्यातील शेतकरी, भाजप व किसान मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहे. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com