राज्यात कर्करोगाचे पाच हजारांवर नवे रुग्ण

Cancer-Patient
Cancer-Patient

जळगाव - राज्यात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होत असून, २०१६ आणि २०१७  च्या तुलनेत २०१८ मध्ये कर्करोगाच्या रुग्णांमध्ये पाच हजार ७६१, तर मृतांमध्ये २ हजार ९१९ ने वाढ झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ‘नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फर्मेटिक्‍स अँड रिसर्च नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्रॅम’च्या अहवालातून ही माहिती उघड आली आहे.

देशासमोर झपाट्याने पसरणारा कर्करोग हे मोठे आव्हान आहे. महाराष्ट्रातही कर्करोगाचे प्रमाण गेल्या तीन वर्षांत वाढत आहे. राज्यात कर्करोगामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही गेल्या तीन वर्षांत वाढली आहे. कर्करोग कोणालाही होऊ शकतो; परंतु त्याच्या प्रमुख कारणांपैकी महत्त्वाचे कारण म्हणजे अनुवांशिकता आणि अनियमित जीवनशैली आहे. वेळीच कर्करोगाचे निदान झाल्यास कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूवर नियंत्रण मिळविणे शक्‍य आहे.

त्यासाठी प्रत्येकाने कर्करोगाची तपासणी करणे आवश्‍यक आहे. सध्या तोंडाचा, स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com