विनातारण कर्जमर्यादेत 60 हजारांची वाढ 

विनातारण कर्जमर्यादेत 60 हजारांची वाढ 

मुंबई - रिझर्व्ह बॅंकेने गुरूवारी (ता.7) जाहीर केलेल्या पतधोरणात अल्प भूधारक शेतकऱ्यांची विनातारण कर्ज मर्यादा एक लाखांवरून 1 लाख 60 हजारांपर्यंत वाढवली आहे. या निर्णयाने जवळपास 12 कोटी अल्प भूधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. 2010 मध्ये बॅंकेने एक लाखांपर्यंत विनातारण कृषी कर्जाची मर्यादा निश्‍चित केली होती. मात्र चलनवाढ आणि उत्पादन खर्च लक्षात घेता बॅंकेने विनातारण कर्जाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला. याशिवाय कृषी कर्जासंबधी बॅंकेने अंतर्गत गटाची स्थापना केली असून या गटाकडून कृषी क्षेत्रातील पत पुरवठा सुरळीत करण्याला प्राधान्य दिले जाईल. 

विनातारण कर्ज मर्यादेत वाढ झाल्याने आठवडाभरात बळीराजाला दुसरा सुखद धक्का बसला आहे. गेल्या शुक्रवारी (ता.1) अंतरिम अर्थसंकल्पात केंद्र सरकारने अल्प भूधारक शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजारे रुपये देण्याची घोषणा केली होती. त्याशिवाय किसान क्रेडीट योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना दोन टक्के व्याजदर अनुदान जाहीर करण्यात आले. शिवाय वेळेत कर्जफेड करणाऱ्यांना पाच टक्के व्याजदर अनुदान जाहीर करण्यात आले होते. आता रिझर्व्ह बॅंकेने विनातारण कर्जाची मर्यादा वाढवल्याने छोट्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यास फायदा होईल. यामुळे पत व्यवस्थेची व्याप्ती छोट्या शेतकऱ्यांपर्यंत वाढवणे शक्‍य होईल, असे पतधोरणात म्हटले आहे. कृषीमधील पत पुरवठ्यातील अडथळे दूर करून तो वाढवण्यासाठी अंतर्गत गटाकडून अभ्यास केला जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com