पुणे - गेल्या वर्षभरात राज्यात १ हजार १९० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यामध्ये सर्वाधिक अपघाती मृत्यू हे पाण्यात बुडून आणि संर्पदंशाने मृत्यू झाले आहेत. त्यांना राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेतून मदत दिली आहे. दरम्यान, दिवाळीनंतर बुधवारपासून (ता. १३) राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे.
एकीकडे शहरांचा विकास होत आहे, तर दुसरीकडे रस्ते अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत. अनेकदा शाळकरी मुलांचा मृत्यू होतो, तर काहीजण जायबंदी होतात; तसेच नैसर्गिक आपत्ती, सर्पदंश, पाण्यात बुडून मृत्यू ही, मृत्यूची कारणे आहेत. अशा घटनांमध्ये विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने २०११ मध्ये राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजना सुरू केली.
यंदा सरासरीपेक्षा पाऊस झाल्याने नद्या, नाले, विहिरी, तलाव, धरणे तुंडुब भरली आहेत. यात बुडून विद्यार्थ्यांचा मृत्यू होतो. तीन दिवसांसापूर्वी पुणे विभागातील सर्व शिक्षणाधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूवर चर्चा झाली. त्यामध्ये जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन हे अपघात कमी करण्यासाठी कोणती सावधगिरी बाळगावी, याबाबत पालकांचे प्रबोधन करावे, अशा सूचना सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
२०१७-१८ मध्ये योजनेअंतर्गत १ हजार ६९ विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली होती; तर २०१८-१९ मध्ये १ हजार १९० विद्यार्थ्यांना मदत दिली आहे. विद्यार्थ्याच्या अपघाती मृत्यूस ७५ हजार, दोन अवयव निकामी झाल्यास ५० हजार; तर एक अवयव निकामी झाल्यास ३० हजार रुपये मदत दिली जाते, असे प्राथमिक शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.