राज्यात ‘अवकाळी’चा पिकांना फटका; बागायदार धास्तावले

Loss
Loss

पुणे - उन्हाळ्याच्या झळा वाढू लागताच पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्यात गुरुवारी (ता.१८) सायंकाळी अकोला, बुलडाणा, नांदेड, परभणी, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यांत ठिकठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी पडल्या. काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली. यामुळे काढणीयोग्य असलेल्या गहू, हरभरा, द्राक्षे, कांदा अशा पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण झाले आहे. पावसासाठी पोषक वातावरण आहे. विदर्भातील अकोला जिल्ह्यांतील तेल्हारा, मलकापूर, कोल्हापुरातील पन्हाळा, नांदेडमधील तालुक्यातील सोमेश्‍वर, राहटी, जैतापूर, परभणी जिल्ह्यांतील रवळगाव (ता. सेलू), जिंतूर तालुक्यातील बेलखेडा, नाशिकमधील कळवण, निफाड, चांदवड, पेठ या भागात पाऊस पडला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुढील तीन दिवस पावसाची शक्यता 
सध्या ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पहाटेचा गारठाही गायब झाल्याने कमाल तापमानासह, किमान तापमानातही वाढ झाली. पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक भागांत अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस होईल. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com