अजित पवार म्हणतात, मनसेने आमच्यासोबत यावे

अजित पवार म्हणतात, मनसेने आमच्यासोबत यावे

मुंबई : मतांचे विभाजन टाळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकत्र यायला हवे, असे माझे वैयक्तिक मत आहे, असे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टींनीही एकत्र यावे. त्यांचे गैरसमज दूर करू, असे ते म्हणाले.

ते म्हणाले, लोकसभेच्या 48 पैकी 44 जागांची चर्चा झालेली आहे. आता उरलेल्या 4 जागांवर लवकरच चर्चा केली जाणार आहे. राज्यात मनसेबाबतही वेगवेगळी भूमिका स्पष्ट केलेली आहे. राजू शेट्टींचे गैरसमज दूर केले जाईल. जर खरंच शिवेसना-भाजपचा पराभव करायचा असेल सेक्युलर विचारसरणी असलेल्यांना एकत्र आणले जावे, असे माझे मत आहे. तसेच यापूर्वी भाजपबाबत बोलणाऱ्यांना आता कळत आहे. अनेकजणांना एकत्र घ्यायला हवे. यापूर्वी मोदींना पाठिंबा देणारेच आता त्यांच्याबाबत काय बोलतात ते आपण पाहत आहोत. आता अशा सर्वांनी एकत्र यावे, असे मला वाटत आहे. 

दरम्यान, पाच वर्षांच्या कार्यकाळात आम्ही सर्वजण होरपळून गेलो आहे. त्यामुळे आता बदल घडविण्यासाठी आता सर्वांनी एकत्र यायला हवे, असेही ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com