कोण होणार यंदाच्या संमेलनाचे अध्यक्ष?

Akhil-Bhartiy-Marathi-Sahitya Sammelan
Akhil-Bhartiy-Marathi-Sahitya Sammelan

लातूर - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादेत होणार, हे निश्‍चित झाल्यानंतर आता संमेलनाध्यक्ष कोण, याबाबात साहित्यवर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या पदासाठी निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर, कविवर्य ना. धों. महानोर, साहित्यिक रा. रं. बोराडे, सुधीर रसाळ या साहित्यिकांची नावे चर्चेत आहेत. त्यात आणखी काही नावांची भर पडणार का, संमेलन मराठवाड्यात होणार असल्याने अध्यक्षही मराठवाड्यातील असेल का, याबाबत उत्सुकता आहे.

साहित्य महामंडळाने आपल्या घटनेत बदल करून अध्यक्षपदाची निवडणूक बंद केली आहे. ज्येष्ठ-श्रेष्ठ साहित्यिकांना सन्मानाने अध्यक्षपद मिळावे म्हणून मागील वर्षी हा बदल करण्यात आला आहे. संमेलनाध्यक्षपदासाठी महामंडळाच्या संलग्न, समाविष्ट संस्थांकडून नावे मागवली जातात. संबंधित संस्थांनी एक ते तीन नावे पाठविणे आवश्‍यक आहे. चार नावे पाठवली, तर चारही बाद होतात. त्यामुळे संस्थांना कमाल तीनच नावे पाठवावी लागतील.

त्यानुसार मराठवाडा साहित्य परिषद (औरंगाबाद), महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे), विदर्भ साहित्य संघ (नागपूर), मुंबई साहित्य संघ (मुंबई) या संस्था कोणकोणती नावे महामंडळाकडे पाठविणार, याकडे लक्ष लागले आहे.

साहित्य संस्थांकडून आलेली नावे साहित्य महामंडळाच्या बैठकीत ठेवली जातील. एकमताने किंवा बहुमताने संमेलनाध्यक्ष जाहीर होईल. ऑक्‍टोबरअखेरीस या नावाची घोषणा होईल.
- कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष, साहित्य महामंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com