अन्नछत्रात लवकरच महाप्रसादगृह

Akkalkot
Akkalkot

अक्कलकोट - येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळास ३२ वर्षे पूर्ण होत असून, यंदाच्या वर्षापासून राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरीय पुरस्कारांच्या योजनेने मंडळाच्या सामाजिक कार्यात भर पडली आहे. जुन्या महाप्रसादगृहाच्या ठिकाणी लवकरच ५० कोटी रुपये खर्चाचे नवीन महाप्रसादगृह बांधण्याचे नियोजन असल्याची माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेंजय भोसले यांनी दिली. १५ ते २० हजार भक्त लाभ घेत असलेल्या दैनंदिन अन्नदान योजनेबरोबरच संस्थेच्या वतीने विविध सामाजिक कार्य केले जाते.

गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर १९८८ मध्ये राजघराण्याचे वारस जन्मेंजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी सहकाऱ्यांसमवेत मोहन पुजारी यांच्याशी चर्चा करून चार घरी भिक्षा मागून जमा झालेल्या तीन किलो तांदळाचा मंदिरात स्वामीभक्तांना महाप्रसाद दिला. तेव्हापासून अन्नछत्राची सुरवात झाली. या घटनेस गुरुपौर्णिमेस ३२ वर्षे पूर्ण झाली. अन्नछत्राची सुरवात वटवृक्ष मंदिराच्या उत्तर महाद्वारालगत अंबुबाई सरदेशमुख यांच्या जागेत झाली. भक्तांची गर्दी वाढू लागल्याने न्यासाने वीरभद्र कोळ्ळे यांची जमीन घेऊन पत्राशेड उभारले.

उद्योजक दत्ताअण्णा सुरवसे व इतर देणगीदारांच्या मदतीतून अन्नछत्राचा आज वटवृक्ष झाला. हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून हे न्यास कार्य करीत आहे. संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई जन्मेंजयराजे भोसले आहेत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या संकल्पनेतून व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसृष्टी व शिवचरित्र धातूशिल्प प्रदर्शन साकारण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com