बौध्द काळातही होत्या समृध्द ग्रामपंचायती

Akola Marathi News There were prosperous gram panchayats in Buddhist times
Akola Marathi News There were prosperous gram panchayats in Buddhist times

अकोला: निवडणुकीचं बिगूल वाजलंय. तुमच्याबी गावातलं वातावरण सध्या तापलं असेल. बैठका, चर्चा यांनी जोर धरला असेल. पण, ग्रामपंचायतीची निवडणूक पूर्वी कशी होती, याचीच माहिती आता आपण पाहणार आहे.

सर्व जगाला भारताने फार मोठी दिलेली देणगी म्हणजे गौतम बुद्ध. इतिहासानं ते मान्य केलं आहे. ज्ञानाची, ललित कलांची, शिक्षण संस्कारांची आणि समाजसेवेची महान परंपरा या धर्मानेच प्रस्थापित केली. समतेचा विचारही या धर्मानं अग्रक्रमावर ठेवला. विविधतेतही समान न्याय अबाधित राहिला पाहिजे असा या धर्माचा आग्रह.

पंचायत राजचे सुवर्ण युग
 बुद्ध कालीन जातक कथामध्ये भारतातील शिलालेखावरील गाव हे स्वयंशासित होते असा उल्लेख आढळतो. त्याचप्रमाणे कौटिल्याच्या “अर्थशास्त्र” या ग्रंथामध्ये सुद्धा ग्राम प्रशासनाचा स्पष्ट उल्लेख आढळतो.
यासोबतच प्राचीन कालखंडालाच पंचायत राजचे सुवर्ण युग मानले जाते. ग्रीस मधून आलेल्या मॅगेस्थेनिस  या प्रवाशाने आपला प्रवास वर्णनात ग्रामपंचायतीचे सविस्तर वर्णन केले आहे.

मानवी समुह आकांक्षेच प्रतिक
माणूस हा समूह जीवनाचा घटक आहे. म्हणून समुहाबरोबर त्यानं कसा व्यवहार करावा हे मानवतावादी तत्त्वज्ञान धर्माची प्रेरणा होऊ शकतं. गौतमाचा धर्म अशाच आकांक्षांचं प्रतिक आहे. करुणा आणि अहिंसा या मुलभूत तत्त्वांचं मोल त्याला अधिक वाटतं.

पंचायतराज संस्थांना उतरती कळा
मोगल कालखंडामध्ये पंचायत राज संस्थांना हळू हळू उतरती कळा लागली. याच कालखंडात शहरीकरणावर लक्ष केंद्रित करण्यात आले व गावातील प्रशासन चालविण्यासाठी कोतवाल, सरपंच व मुखिया हि पदे निर्माण करण्यात आली.
 

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com