कर्नाटक, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोल्हापूरच्या जावयाचा फोन; पूरस्थिती नियंत्रणात आणण्याचे आदेश

कर्नाटक, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोल्हापूरच्या जावयाचा फोन; पूरस्थिती नियंत्रणात आणण्याचे आदेश

कोल्हापूर : सांगली आणि कोल्हापुरातील पूर हटवण्यासाठी केंद्र सरकारही सक्रिय झाले असून कर्नाटकातील अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्याचा निर्णय कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी घेतला. हा विसर्ग दोन लाखांहून पाच लाख करण्यात आला.

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शाह यांनी यासाठी पुढाकार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि येडियुरप्पा या दोघांनाही फोन केल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केले. 

कोल्हापूरचे जावई असलेले अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करुन सर्व प्रकारचं सहाय्य करण्याचं आश्वासन दिले. अलमट्टी धरणातून पुढे विसर्ग वाढवल्यास सांगलीतील पाणी कमी होण्यास मदत होईल. महाराष्ट्राच्या विनंतीवरुनच कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अमित शहा यांनी येडियुरप्पा यांच्यासोबतही चर्चा केल्याचे बोलले जात आहे. म्हणूनच आता सोशल मीडियावर तरी कोल्हापूरच्या जावयाने कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन केल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com