कृत्रिम पाऊस लाल फितीत अडकला

Artificial-Rain
Artificial-Rain

राज्याचा केंद्राकडे प्रस्ताव - मुंबई, औरंगाबाद, सोलापुरातील रडार सज्ज
सोलापूर - मॉन्सूनच्या सुरुवातीलाच पावसाने बळिराजाला हुलकावणी दिल्याने दुष्काळाची दाहकता आणखीच वाढली आहे. पावसाच्या प्रतीक्षेतील बळिराजाला खरीप पेरणीची चिंता सतावू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्याचा प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाने नुकताच केंद्राला पाठविला आहे. मात्र, विविध विभागांच्या परवानगीसाठी दीड महिन्यांची प्रतीक्षा करावी लागेल, असे मदत व पुनर्वसन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

मुंबई विमानतळ येथे भारतीय हवामान खात्याचे, तर सोलापुरात केंद्र सरकारच्या ‘आयआयटीएम’ संस्थेचे रडार कृत्रिम पावसाकरिता सज्ज आहे. आता नव्याने औरंगाबाद विमानतळावरही रडार बसविण्यात येणार आहे. रडारच्या माध्यमातून ढगांचा वेध घेऊन कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली. मात्र, कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यापूर्वी निती आयोग, गृहमंत्रालय, नागरी हवाई उड्डाण, परराष्ट्र मंत्रालय आणि सीमाशुल्क विभागाच्या परवानगीची आवश्‍यकता आहे.

दरम्यान, वायरलेस व रेडिओ लहरींचा वेध घेण्यासाठी हवामान विभागाची परवानगी आवश्‍यक आहे. या विभागांच्या परवानगीशिवाय कृत्रिम पावसाचा प्रयोग अशक्‍य असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

राज्यात मॉन्सूनने पहिल्याच टप्प्यात हुलकावणी दिल्याने सोलापूर, औरंगाबाद व मुंबईतून रडारद्वारे कृत्रिम पाऊस पाडला जाणार आहे. त्यासाठी राज्याने केंद्राकडे प्रस्ताव दाखल केला आहे. परवानगी लवकर मिळाल्यास तत्काळ कार्यवाही सुरू होईल.
- श्रीरंग घोलप, अतिरिक्त सचिव, मदत व पुनर्वसन विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com