'अखेर भाजपाला गजर करावा लागला अन् पालिका प्रशासन जागं झालं'
भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांच्या एका ट्विटची मुंबई महापालिकेने २४ तासांच्या आतच दखल घेवून तात्काळ पावलं उचलली आहेत. शेलार यांनी स्वतः याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. दरवर्षी मार्च महिन्यात मुंबईत नालेसफाईच्या कामांना सुरुवात होते. यावेळी अद्याप कंत्राटच मंजूर झालेलं नाही. त्यामुळे आता जरी मंजुरी दिली तरी 15 एप्रिल नंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. सुमारे 375 किमीचे नाले अवघ्या दीड महिन्यात कसे साफ होणार?, असा सवाल भाजपाचे आशिष शेलार यांनी केला होता. मात्र शेलारांच्या या ट्विटनंतर या कामासाठी महापालिकेने मंजुरी दिली आहे.
काय म्हणाले होते शेलार?
दरवर्षी मार्च महिन्यात मुंबईत नालेसफाईच्या कामांना सुरुवात होते. यावेळी अद्याप कंत्राटच मंजूर झालेले नाही. त्यामुळे आता जरी मंजुरी दिली तरी 15 एप्रिल नंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. सुमारे 375 कि. मी.चे नाले अवघ्या दिड महिन्यात कसे साफ होणार? 7 मार्चला स्थायी समितीत 160 कोटीचा प्रस्ताव आला, पण सत्ताधाऱ्यांनी तो राखून ठेवला. मुदत संपली आणि मुंबईकरांना वाऱ्यावर सोडून सत्ताधारी फरार. का प्रस्ताव राखून ठेवला? काही अंडरस्टॅंडिंग बाकी होते का? हे असले कारभारी. मुंबईकरांपेक्षा स्वतःच्याच मालमत्तांची चिंता भारी!
आज दिली कामाला मंजूरी :
आशिष शेलार यांनी ट्विट करुन मुंबई महापालिकेने नालेसफाईच्या कामांना मंजुरी दिली असल्याचे सांगितले आहे. याशिवाय त्यांनी यावेळी यशवंत जाधव प्रकरणावरुन शिवसेनेले टोला देखील लगावला आहे. ते म्हणाले, सत्ताधीशांकडे "पन्नास लाखांचे घड्याळ" असले तरी मुंबईतील नालेसफाईच्या कामाचे टायमिंग चुकले होते. अखेर भाजपाला गजर करावा लागला. पालिका प्रशासन जागे झाले,नालेसफाईच्या कामांना मंजुरी मिळाली. आता गाळ काढण्याच्या कामावर करडी नजर राहिलच. कारण भाजपासाठी "मातोश्री" (आई) मुंबईकरच!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.