भामा आसखेड आंदोलकांचा ठिय्या

भामा आसखेड आंदोलकांचा ठिय्या

आंबेठाण -  प्रलंबित मागण्या पूर्ण करा; अन्यथा धरणातून पाणी सोडू देणार नाही, असा इशारा देत भामा आसखेड आंदोलकांनी धरण परिसरात ठिय्या मांडला आहे. नदीपात्रात पाणी सोडण्याचे आदेश असताना आंदोलकांच्या विरोधामुळे सलग दुसऱ्या दिवशी पाणी सोडता आले नाही. जबरदस्तीने पाणी सोडल्यास सामूहिक जलसमाधी घेऊ, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

या प्रसंगी सत्यवान नवले, देविदास बांदल, किसन नवले, गणेश जाधव, धोंडिभाऊ कुडेकर, शांताराम शिवेकर, तुकाराम नवले, स्वप्नील येवले, अक्षय डागले, निवृत्ती नवले, किसन नवले, संजय देशमुख यांच्यासह जवळपास दोनशे शेतकरी उपस्थित होते. भामा आसखेडचे उपविभागीय अधिकारी शिवप्रसाद शर्मा आणि चाकण पोलिसांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला; परंतु प्रकल्पग्रस्त शेतकरी पाणी न सोडण्याच्या  भूमिकेवर ठाम राहिले. प्रशासनाने जबरदस्ती करून पाणी सोडले तर मुलाबाळांसह धरणाच्या पाण्यात सामूहिक जलसमाधी घेऊ, असा इशारा या वेळी आंदोलकांनी दिला आहे.


रब्बी हंगामातील पहिले आवर्तन कालपासून (ता.२२) सोडण्याचे आदेश आहेत; परंतु शेतकऱ्यांच्या विरोधामुळे पाणी सोडता येत नाही. वरिष्ठ सांगतील तसा निर्णय घेऊ.
- शिवप्रसाद शर्मा, उपविभागीय अधिकारी, भामा आसखेड प्रकल्प

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com