बॅंक खात्याकडे शेतकऱ्यांच्या नजरा

Fund
Fund

६३४ कोटी प्रलंबित; मशागतीसाठीही पैसे नाहीत
सोलापूर - मागच्या वर्षीच्या खरीप हंगामातील ६३४ कोटी रुपये मार्चएंडमुळे सरकारला परत पाठविण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, अचूक खाते क्रमांक तलाठ्यांकडे देऊनही रक्‍कम जमा न झाल्याने आता खरीप मशागतीच्या तयारीत असलेल्या आठ लाख ७३ हजार शेतकऱ्यांच्या नजरा बॅंक खात्याकडे लागल्याचे चित्र आहे. मशागतीसाठी पैसे नसलेल्या शेतकऱ्यांना रकमेची प्रतीक्षा असतानाच अधिकारी मात्र शेतकरी खोटे बोलत असल्याचे सांगत आहेत.

ढगाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आता उशिरा का होईना, परंतु खरीप पिकांची पेरणी करावयाची आहे. मागील काही दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आहे. मात्र, मशागतीसह बियाणे व खतांसाठी बळिराजाकडे पैसेच नाहीत. सोलापूर, नगर, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, बीड, उस्मानाबाद, यवतमाळ, परभणी व अकोल्यातील शेतकरी मागच्या वर्षीची नुकसान भरपाई मिळेल, या आशेवर बसला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना किती दुष्काळ निधी मिळाला, आणखी शेतकऱ्यांसाठी किती रकमेची मागणी करावी लागेल, याचीही माहिती अधिकाऱ्यांनी संकलित केलेली नाही. मागच्या वर्षी काहीच उत्पन्न न मिळाल्याने यंदा पैशांअभावी बहुतांश मशागतदेखील केली नसल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com