‘विरोधात संदेश जाणार नाही याची खबरदारी घ्या’ - देवेंद्र फडणवीस

Devendra-Fadnavis
Devendra-Fadnavis

मुंबई - विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आल्यामुळे सरकारच्या विरोधात कोणताही संदेश जनतेमध्ये जाणार नाही. याची खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री यांनी आणाभाका घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यातील पूरस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या बैठकीत सांगली-कोल्हापूर-सातारा या जिल्ह्यांसह राज्यातील इतर ठिकाणी आलेल्या पुराबाबत चर्चा करण्यात आली.

राज्यात आलेल्या पुराचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने ६ हजार ८०० कोटी रुपये इतकी आर्थिक मदत केंद्राकडे मागितली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कोकणात आलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीवर मात करण्यासाठी सर्व मंत्र्यांनी एकमताने काम करावे. तसेच परस्परातील विसंवाद टाळावा. सरकारची प्रतिमा मलिन होईल, जनतेच्या मनात रोष निर्माण होईल, अशी विधाने करू नयेत, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे समजते. 

मंत्रिमंडळ बैठकीला भाजप आणि शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना बोलावले होते. मागील कित्येक महिन्यांत मंत्रिगटाची बैठक बोलावली नव्हती. मात्र, राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही मंत्रिगटाची बैठक बोलावली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com