नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून औरंगाबादचा पाणी प्रश्न चांगलाच चर्चेत आहे. या पाणी प्रश्नावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला होता. यानंतर मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना टोला लगावला होता. या वादात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी उडी घेत मुख्यमंत्र्यांसमोरच ‘मोदी है तो मुमकीन है’ असे म्हणत हल्ला चढवला. (Bhagat Singh Koshyaris attack on Chief Minister over Aurangabad water issue)
मागे मी औरंगाबादमध्ये गेलो होतो. यावेळी येथील नागरिकांनी माझ्याकडे येत पाणी प्रश्न उपस्थित केला होता. आम्हाला पाच ते सात दिवस पाणी मिळत नाही, अशी तक्रार केली होती. असे अनेक प्रकल्प आहे जे रखडले आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात हे प्रश्न निकाली लागतील. अरुण जेटली सर्वांत अगोदर म्हणाले होते ‘मोदी है तो मुमकीन है’. मी आठ वर्षांनी म्हणतो ‘मोदी है तो मुमकीन है’, असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) म्हणाले.
औरंगाबादच्या (Aurangabad) पाणी प्रश्नाला घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रोश मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला होता. अद्याप पाणी प्रश्न निकाली न निघाल्याने येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे म्हटले होते. तसेच या कामात भ्रष्टाचार होत असल्याचे म्हटले होते.
यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांची औरंगाबादमध्ये सभा पार पाडली. यावेळी त्यांनी तो मोर्चा सत्तेसाठी केलेला आक्रोश मोर्चा होता, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला केला होता. आमच्या अगोदर तुमचीच सत्ता होती. मग का नाही सोडवला पाण्याचा प्रश्न असा प्रश्नही विचारला होता. सोबतच औरंगाबादच्या पाण्याचा प्रश्न आम्हीच सोडवू असेही म्हटले होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.