Bharat Jodo: शंभर दिवस, १२३९ गावं, १३ नगरपालिका; सतेज पाटलांचा कोल्हापुरात मोठा प्लॅन

सतेज पाटील कोल्हापूर आणि इचलकरंजीसाठी मैदानात
bharat jodo
bharat jodoesakal

कन्याकुमारीपासून सुरू झालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा दिडशे दिवसांत तीन हजार 570 किलोमीटर अंतर कापणार आहे. बारा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातून जाताना राहुल गांधी व त्यांचे 119 सहकारी दररोज सात तास चालत आहेत. म्हणजेच रोज 20 ते 22 किलोमीटर अंतर चालतात.

दरम्यान महाराष्ट्र काँग्रेस, कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील सुध्दा आता कोल्हापूर आणि इचलकरंजीसाठी मैदानात उतरले आहे. सतेज पाटलांच्या संकल्पनेतून कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये 100 दिवस 1239 गावांमध्ये 13 नगरपालिका आणि नगरपंचायतील सर्व क्षेत्रात 100 दिवस 13 एलईडी स्क्रीनच्या माध्यामातून 'भारत जोडो यात्रेचे' प्रेक्षेपण करण्यात येणार आहे.

आणि त्याचा शुभारंभ शनिवारी 8 ऑक्टोबरला दसरा चौकातून करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी खासदार दिग्विजय सिंगजी, एच.के.पाटील. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात उपस्थित होते. दरम्यान 'भारत जोडो यात्रा' मध्ये महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांचा समावेश आहे. याचा मोठा प्रभाव कोल्हापूरकरांवर पडेल असं सांगितले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com