'या' कारणांमुळेच हरलो, भाजपच्या पराभूत उमेदवारांचा सूर

Untitled-3.jpg
Untitled-3.jpg

मुंबई : भाजपने 59 पराभूत उमेदवारांसोबत बैठक घेऊन पराभवावर विचारमंथन केलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेली सभा आणि शिवसेना यांच्यामुळे पराभव झाला, असा सूर भाजपच्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीत निघाला.

दरम्यान, भाजपने शिवसेनेला एनडीएतून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर 25 वर्ष जुन्या युतीत फाटाफूट झाल्याचं स्पष्ट झालं. शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची मागणी भाजपने अमान्य केली आणि दोघांमध्ये दुरावा आला. राज्यातल्या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपने मंथन बैठकीचं आयोजन केलं होतं.

यावेळी पराभूत उमेदवारांनी शिवसेनेने केलेल्या असहकार्यामुळे आम्हाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला असा सूर लावला. याशिवाय शरद पवारांनी भर पावसात घेतलेली सभाही पराभवासाठी कारणीभूत ठरल्याचं या उमेदवारांचं म्हणणं आहे. या बैठकीला पंकजा मुंडे, राम शिंदे, राजकुमार बडोले, एकनाथ खडसेंची कन्या रोहिणी खडसे, हर्षवर्धन पाटील आणि वैभव पिचड यासारखे दिग्गज उमेदवार उपस्थित होते.

भाजपने विधानसभा निवडणुकीत 164 जागा लढवल्या होत्या, मात्र 105 जागांवरच त्यांना विजय मिळवता आला. काही उमेदवारांना स्वीकारावा लागलेला पराभव हा निसटता होता. यावेळी स्थानिक कारणं देखील कारणीभूत असल्याचं निष्कर्ष काढण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com