कृषी पथदर्शक राज्य साकारण्याची संधी - राज्यपाल

C-Vidyasagar-Rao
C-Vidyasagar-Rao

पुणे - ‘शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक शेती तंत्र पोचवून देशाच्या कृषी नकाशावर एक पथदर्शक राज्य साकारण्याची संधी आणि क्षमता महाराष्ट्राकडे आहे. त्यासाठी शेतीला शाश्वत विकासाकडे घेऊन जात शेतमाल निर्यात, फलोत्पादन, विस्तार आणि आधुनिक शेती क्षेत्रात भक्कम काम करावे लागेल,’’ असे प्रतिपादन राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केले. राज्यपालांनी सन्मानाचा डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार चंद्रशेखर भडसावळे व शिवनाथ बोरसे यांना दिला. 

बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये कृषी व फलोत्पादन क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शेतकरी व उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या राज्य कृषी विभागाच्या पुरस्कारांचे वितरण गुरुवारी (ता. १४) दिमाखदार सोहळ्यात झाले. त्या प्रसंगी राज्यपाल राव बोलत होते. व्यासपीठावर कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत होते. 

या वेळी ११२ शेतकऱ्यांसह संलग्न क्षेत्रातील व्यक्तींना गौरविण्यात आले. २०१५ मधील ५५ आणि २०१६ मधील ५७ पुरस्कार्थी शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. पुरस्कार्थींमध्ये अग्रोवनचे प्रतिनिधी गणेश कोरे, संदीप नवले व सूर्यकांत नेटके यांचाही समावेश होता.

रोहयो संकल्पना शेतीत आणू - पाटील
कृषिमंत्री पाटील म्हणाले, ‘‘आम्हाला शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे आहेच, पण त्याच बरोबरीने खते, बियाणे, कीटकनाशकांवरील खर्चदेखील कमी करायचा आहे. त्यासाठी रोजगार हमी योजनेतील संकल्पना शेतीसाठी वापरल्यास शेतकऱ्यांना खर्चात दिलासा मिळेल. या संकल्पनेवर आमचे काम सुरू आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com