परीक्षेची तारीख बदला; विद्यार्थी ठोठावणार हायकोर्टचा दरवाजा!

High-Court
High-Court

पुणे : मुंबई महापालिकेच्या आणि जलसंपदा विभागाच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठीची परीक्षा एकाच दिवशी 25 नोव्हेंबर रोजी होत आहे. त्याचा फटका तब्बल 25 हजार उमेदवारांना बसणार असल्याने परीक्षेची तारीख बदलावी यासाठी उमेदवारांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात मंगळवारी (ता.19) याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

'एकाच दिवशी परीक्षेमुळे उमेदवार धास्तावले' या मथळ्याखाली 'सकाळ'ने उमेदवारांच्या समस्येला वाचा फोडली. मुंबई महापालिकेने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 243 पदांसाठी 25 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन परीक्षेची तारीख ऑक्‍टोबर महिन्यात जाहीर केली होती. तर जलसंपदा विभागाने हीच 500 पदे भरण्यासाठी 13 नोव्हेंबर रोजी हीच तारीख जाहीर केली. या दोन्ही परीक्षा देणारे राज्यात सुमारे 25 हजार उमेदवार आहेत, पण आता त्यांना कोणतीतरी एकच परीक्षा द्यावी लागणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.

उमेदवारांनी पाठविलेल्या इमेल आणि त्यांच्या फोनला अधिकाऱ्यांकडून कोणतेही उत्तर येत नसल्याने राज्यातील 2 हजार पेक्षा जास्त उमेदवारांनी एकत्र येऊन याविरोधात औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल करण्याचा निर्णय केला. त्यासाठी त्यांनी निधीही जमा केला आहे.

सोमवारी ही याचिका दाखल करण्यात येणार होती, पण दुपारपर्यंत कागदपत्र जमा न झाल्याने मंगळवारी याचीका दाखल केली जाणार आहे. प्रेमकुमार दराडे, श्रीराम बेजनकीवार, राज दराडे, दीपक माळे, खुश जाधव यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली जाणार आहे.

आमदार रोहित पवार विद्यार्थ्यांच्या पाठीशी!

दरम्यान, आमदार रोहित पावार यांनी यासंदर्भात मुंबई महापालिका आणि जलसंपदा विभागाला पत्र पाठवून परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्याची मागणी केली आहे. तसेच पाटबंधारे विभागाच्या राज्यभरती निवड समितीचे सचिव बा.ज. गाडे यांना वारंवार फोन केले, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com