अतिवृष्टीमुळे महाराष्ट्राला केंद्र सरकारने मदत करावी : राहुल शेवाळे

shewale
shewale

मुंबई : मुसळधार पावसामुळे इमारत किंवा भिंत कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या, 'नॅशनल बिल्डिंग कोड'ची (राष्ट्रीय भवन निर्माण संहिता) अंमलबजावणी करण्याची सक्ती राज्य सरकार आणि महानगरपालिकेला करावी, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी मंगळवारी लोकसभेत केली. तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी केंद्र सरकारने मुंबईला मदत करावी, अशी मागणीही शेवाळे यांनी केली.

मुंबईसह संपूर्ण राज्यभरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाची माहिती देण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी शून्य प्रहरात प्रश्न उपस्थित केला. खासदार शेवाळे आपल्या भाषणात म्हणाले, "वास्तविक, संपूर्ण जुलै महिन्यात पडणारा पाऊस केवळ दोन दिवसांत पडला आहे. यामुळे मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई-पुण्यात मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून काही लोकांचा मृत्यू झाला.अशा गंभीर दुर्घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या 'नॅशनल बिल्डिंग कोड' ची अंमलबजावणी राज्य सरकार आणि पालिकेला सक्तीची करावी. या कोडचा वापर ऐच्छिक असल्या कारणाने त्याचा वापर केला जात नाही."

तसेच, मुसळधार पावसामुळे मुंबईत निर्माण झालेल्या गंभीर स्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने रेल्वे आणि इतर माध्यमातून मुंबईला मदत करावी, अशी मागणीही खासदार राहुल शेवाळे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com