पहिल्याच दिवशी सरकारवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ

Chandrakant Patil
Chandrakant Patil

मुंबई : माजी विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार न झाल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केल्यानंतर सरकारवर पहिल्याच दिवशी विधान परिषदेत दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली.

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून (सोमवार) सुरवात झाली आहे. विरोधी पक्षांनी मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, दुष्काळ आदी मुद्द्यांवरून सरकारला लक्ष्य केले आहे. आज विधानभवनात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, तर विधान परिषदेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रस्ताव मांडला.

विधान परिषदेत शोकप्रस्ताव मांडण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी माजी विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांच्या निधनानंतर त्यांना शासकीय इतमामाम अंत्यसंस्कार करण्यात आले नसल्याबाबत विषय उपस्थित केला. सरकारने माफी मागावी आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करत आजच चौकशी अहवाल सभागृहात ठेवणार असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com