शिवसेना पिंजऱ्यातील वाघ हे राऊतांना मान्य!

शिवसेना पिंजऱ्यातील वाघ हे राऊतांना मान्य!

आमची पिंजऱ्यातील वाघाबरोबर मैत्री नसून जंगलातील वाघाबरोबर मैत्री आहे, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावर आमचा पिंजरा खुला आहे, पिंजऱ्यात येऊन वाघाच्या मिशांना हात लावून दाखवा, असे प्रतिआव्हान संजय राऊत यांनी दिले होते. त्याबाबत विचारले असता ‘मी संजय राऊत यांचे आभार मानतो, त्यांनी वाघ पिंजऱ्यात आहे हे मान्य केले आहे,’ असे उत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिले. पेठ (सांगली, ता. वाळवा) येथे व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेत वनश्री नानासाहेब महाडिक यांचे तैलचित्र अनावरण व भाजप पदाधिकारी यांच्या मेळाव्याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत शनिवारी ते बोलत होते.

यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील सत्ताधारी पक्षावर टीकेची झोड उडवली. अजित पवार यांच्यासोबत आम्ही सरकार स्थापन केले होते, त्यावेळी ते सरकार पाडायला इतका जोर लावला तसा जोर मराठा आरक्षणाच्या बाबतीत का लावला जात नाही, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आह. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत ज्या सवलती देणे शक्य आहे तेदेखील सरकार देत नाही. या सरकारने महाराष्ट्राचे वाटोळं केले आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

शिवसेना पिंजऱ्यातील वाघ हे राऊतांना मान्य!
मुख्यमंत्री ठाकरे-पंतप्रधान मोदी भेटीवर संजय राऊत म्हणतात...

संभाजीराजे छत्रपती कागदोपत्री भाजपचेच खासदार

‘संभाजीराजे छत्रपती हे आमचे राजे आहेत. त्यामुळे त्यांचे नेतृत्व मान्य करायला कोणतीच अडचण नाही. भाजपचे खासदार आहेत की नाही याबाबत राजेंच्या मनात संभ्रम आहे. कागदोपत्री ते भाजपचेच खासदार आहेत. मात्र राजे स्वत:ला ‘राष्ट्रवादी’च्या कोट्यातून खासदार झाल्याचे मानतात. त्या वादात आम्हाला जायचे नाही. मात्र संभाजीराजेंनी धरसोड वृत्ती ठेवू नये. एकदा काय करायचे आहे ते त्यांनी पक्के ठरवावे. ते कधी म्हणतात,‘मी ६ तारखेपर्यंत वाट बघणार, त्यांना या सरकारची वाट लावायची की वाट बघायची आहे? कधी म्हणतात रणशिंग फुंकले, कधी म्हणतात कोल्हापुरातून मोर्चा काढणार... मग म्हणतात कोरोना आहे, मोर्चा काढणे बरोबर नाही... आता म्हणतात, आम्ही कोल्हापूरच्या दसरा चौकात लोकप्रतिनिधींना जनतेद्वारे प्रश्न विचरणार... यातून काय आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे काय?,’’ असा सवाल त्यांनी केला.

राष्ट्रवादीनं उद्धव ठाकरे यांना पत्र लिहावीत -

‘‘मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रवादी पंतप्रधानांना एक कोटी पत्र लिहिणार आहे, ती पत्रे उद्धव ठाकरे यांना लिहिण्याऐवजी पंतप्रधानांना लिहीत आहेत. त्यांचा पत्ता चुकला आहे. मराठा आरक्षणाबाबत त्यांची केंद्राकडे बोट दाखवून चालढकल सुरू आहे. या सरकारने मराठा आरक्षणाबाबत झोपेचे सोंग घेतले आहे.’’, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com