चार भिंतीच्या आत मुख्यमंत्र्यांचा दूष्काळी आढावा

CM
CM

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यासह राज्यात पावसाअभावी दूष्काळाची तीव्रता वाढली आहे. रब्बीचा हंगाम संकटात सापडला असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण आतापासूनच सुरू झाली आहे. असे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तालुक्यांमध्ये जाऊन दूष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी चोख पोलिस बंदोबस्तात जिल्हाधिकारी कार्यालयातील बंद खोलीतच आढावा घेणे पसंद केले.

सोलापूर शहरातील पाण्याची समस्या, वाया गेलेला खरीप, थकीत एफआरपी, पावसाअभावी रब्बी पेरणीवर संकट, जिल्हा बँकाची नाजूक स्थिती, ठप्प झालेली कर्जमाफी यासह मराठा वस्तीगृह उद्घाटनानंतरही बंदच, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळांतर्गत ठप्प झालेले कर्जवाटप, रखडलेले सोलापूर विद्यापीठ नामांतर, धनगर, लिंगायत, मुस्लिम यासह अन्य समाजाचे आरक्षण असे अनेक प्रश्न सध्या प्रलंबित आहेत.

त्यामुळे संतप्त झालेले शेतकरी, नागरिक, समाजबांधव केव्हाही मुख्यमंत्र्यांना अडवू शकतात. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात येणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील विविध विकास कामांचा, दुष्काळी परिस्थितीचा, शहर-जिल्ह्यातील कायदा- सुव्यवस्थेचा आढावा घेतला. तेथून ते थेट दुपारी 3.25 वाजता विमानातून मुंबईला रवाना होणार आहेत.

बैठकीदरम्यान उत्तर सोलापूर व बार्शी तालुका दुष्काळातून वगळल्याने गोंधळ होऊ नये म्हणून विशेष म्हणजे जिल्ह्यातील बहुतांशी लोकप्रतिनिधींना या बैठकीपासून दूर ठेवण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com