मुंबई : कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा. कोणत्याही परिस्थितीत औरंगाबादेतील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे. सध्या पाणीपुरवठ्यात किती आणि कसे पाणी वाढवून मिळेल. त्याकडे विभागीय आयुक्तांनी स्वतःलक्ष घालून नागरिकांना योग्य रितीने पाणी मिळेल हे पाहावे, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले. (Chief Minister Uddhav Thackeray Says, First Address Aurangabad Water Issue)
औरंगाबाद (Aurangabad) शहराच्या पाणीपुरवठा योजनेबाबत आज गुरुवारी (ता.दोन) व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. औरंगाबाद शहर पाणीपुरवठ्यासाठी १६८० कोटींची योजना लवकर पूर्ण व्हावी, यासाठी योजनेचा कालबद्ध रितीने आढावा मुख्यमंत्री संकल्प कक्षातून घ्यावा. योजना पूर्ण करण्यासाठी शासन काहीही कमी पडू देणार नसल्याचे ठाकरे म्हणाले.
त्यातील उणीवा दूर करुन शहरातील नागरिकांना व्यवस्थित पिण्याचे पाणी मिळेल. नव्या पाणीपुरवठा योजनेचे कंत्राटदार संथीगतीने काम करित असल्याच्या तक्रार आहेत. हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. मला कारणे सांगत बसून नका, तातडीने मार्ग काढा, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.