सरकार हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी : मुख्यमंत्री

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

मुंबई : या भ्याड हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही या कठीण प्रसंगी हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहोत. या संकटाचा आम्ही अधिक धैर्याने सामना करू, अशी श्रद्धांजली गडचिरोली जिल्हयात हुतात्मा झालेल्या जवानांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, याबाबत आम्ही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली आहे. महाराष्ट्रातील स्थितीची माहिती दिली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राजनाथ सिंह यांनी आम्ही राज्य सरकारला आवश्‍यक सहाय्य पुरवित आहोत. केंद्रीय गृहमंत्रालय महाराष्ट्र राज्य प्रशासनाच्या संपर्कात असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला.

राज्यशिष्टाचार विभागाचे राज्यातील सर्व निवासी उपजिल्हाधिकारी आदेश
गडचिरोली येथील नक्षलवादी हल्ल्यात आज पोलीस कर्मचारी हुतात्मा झाले आहेत.त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिन निमित्ताने जर आपल्या जिल्ह्यातील शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई केली असेल तर सदर विद्युत रोषणाई आज बंद ठेवावी .याबाबत तात्काळ कार्यवाही कृपया करावी .मंत्रालय व विधानभवन येथील रोषणाई बंद ठेवली आहे, असे आदेश राज्यशिष्टाचार विभागाने राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांना दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com