Vidhan Sabha 2019 : पंतप्रधान मोदींमुळे देशाची अर्थव्यवस्था पंक्चर : गाडगीळ

Vidhan Sabha 2019 : पंतप्रधान मोदींमुळे देशाची अर्थव्यवस्था पंक्चर : गाडगीळ

सोलापूर : "370 व्या कलामबाबत भाजपकडून 'बनवाबनवी' सुरु आहे', असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ यांनी आज (मंगळवार) केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे देशाची आर्थिक प्रगती खुंटली. अर्थव्यवस्था पंक्‍चर झाली, असेही ते म्हणाले.

सोलापुरातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ गाडगीळ मंगळवारी सोलापुरात आले होते. त्यावेळी काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी महापौर यू. एन. बेरिया, हेमू चंदेले उपस्थित होते. 

गाडगीळ म्हणाले,"काश्‍मीरला 370 वे कलम लागू करण्याचा निर्णय तत्कालीन मंत्रिमंडळाचा होता. त्या मंत्रिमंडळात, नंतर जनसंघाचे नेते झालेले शामाप्रसाद मुखर्जी यांचाही समावेश होता. मात्र, त्यांनी या निर्णयाला विरोध केल्याचा कागदोपत्री पुरावा आढळत नाही. या कलमामुळे चित्रपटांचे चित्रीकरण होत नसल्याचा शोध भाजपने लावला होता, मात्र त्यात तथ्य नसल्याचे आढळून आले आहे.''

"राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले; पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमच्या एकाही मंत्र्यावर आरोप झाले नाहीत, असे बेधडक सांगत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे देशाची आर्थिक प्रगती खुंटली. अर्थव्यवस्था पंक्‍चर झाली.

तसेच बांगलादेश, भूतान, नेपाळ यासारख्या देशांपेक्षा आपला जीडीपी दर कमी झाला आहे. 71 हजार कोटींचा बँक गैरव्यवहार, एअर इंडिया, पोस्ट विभाग, बीएसएनएल असे अनेक गैरव्यवहार झाले आहेत. मंदीमुळे तरुणांना रोजगार मिळत नाहीत, अशी स्थिती आहे, असेही गाडगीळ म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com