असा असेल महाशिवआघाडीचा किमान समान कार्यक्रम?

Congress NCP and shivsenas common minimum program
Congress NCP and shivsenas common minimum program

मुंबई : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटलाच नाही आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यानंतर मात्र, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीने मिळून सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र, काँग्रेसकडून या आघाडीचा म्हणजे महाशिवआघाडीचा किमान समान कार्यक्रम आखण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

हा किमान समान कार्यक्रम म्हणजे, शेतकरी केंद्रबिंदू ठेवून योजना आखण्यात याव्यात. शेतकऱ्यांना कर्जमाफी, पाणी, 24 तास वीज या विषयांवर महाशिवआघाडीचे एकमत होऊ शकते. राज्यातील शेतकरी हा सध्या अडचणीत असून त्याला अडचणीतून बाहेर काढणे अत्यंत गरजेचे आहे आणि या विषयावर आघाडी लोकांसमोर जाऊ शकतो असे राजकिय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

राज ठाकरेंचे युतीबाबतचे 'ते' कार्टून वास्तवात उतरलंय?

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासोबत शिवसेनेचा मतदार हा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ग्रामीण राजकारणावर मजबूत पकड असल्याने महाशिवआघाडीतर्फे शेतकरी केंद्रबिंदू ठेवूनच किमान समान कार्यक्रम आखण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com