शिर्डी - "देशासाठी कॉंग्रेसने घेतलेले चांगले निर्णय लोकांपर्यंत पोचविण्यात कार्यकर्ते अपयशी ठरले. भाजपच्या खोट्या प्रचाराचा मुकाबला करता आला नाही, असे मत कॉंग्रेसचे महासचिव हार्दिक पटेल यांनी येथे व्यक्त केले.
युवक कॉंग्रेसतर्फे राहाता येथे आयोजित युवा मंथन शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. माजी खासदार राजीव सातव, आमदार डॉ. सुधीर तांबे, हर्षवर्धन सपकाळ, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष केशवचंद यादव, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे उपस्थित होते.
पटेल म्हणाले, "कॉंग्रेस देश जोडण्याचे, तर भाजप देश तोडण्याचे काम करीत आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कॉंग्रेसने देशाच्या विकासासाठी काय केले, हे जनतेपर्यंत नेण्यात आपण कमी पडलो. गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन्ही राज्ये आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला धडा शिकवू शकतात. गावागावांत जाऊन जनतेच्या समस्यांवर आवाज उठविला, तर आगामी विधानसभा निवडणुकीत विजय अशक्य नाही.''
|