घटनातज्ज्ञ म्हणतात, '...यामुळे राष्ट्रपती राजवटीची शक्‍यता बळावली'

Dr-Subhash-Kashyap
Dr-Subhash-Kashyap

मुंबई : सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजप सरकार स्थापन करण्यासाठी राजी नसल्यानंतर राज्यपालांनी त्यानंतर दुसरा क्रमांक असलेल्या शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी आवश्‍यक असणारे पुरेसे संख्याबळ सिद्ध करण्यासाठी एक दिवसाचा अवधी दिला होता.

या अवधित शिवसेना हा पक्ष पुरेशा आमदारांचे समर्थन असल्याचे सिद्ध करू शकला नाही. यामुळे राज्यात राष्ट्रपती लागवट लागू होण्याची शक्‍यता बळकट झाली असल्याचे मत ज्येष्ठ घटनातज्ज्ञ सुभाष कष्यप यांनी मांडले आहे.

कष्यम यांच्या मताप्रमाणे, शिवसेनेनंतर तिस-या क्रमांकाचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यपाल बोलावू शकते. यानुसार राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी निमंत्रण दिले आहे. यामध्ये 24 तासांचा अवधी देण्यात आला आहे.

तर कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांनी वेगळे मत मांडले आहे. सरोदे यांच्या मते संविधानातील कलम 172 अन्वये राज्यपालांना वेळेची मर्यादा नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सरकार स्थापन करण्याचा दावा नाकारला, तर मात्र राष्ट्रपती लागवट लागू होण्याची शक्‍यता बळावली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com